मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
०००