
मुंबई,दि.१८: पेंच प्रकल्पातील पाणीटंचाई संदर्भातील कामे,गोसीखुर्द प्रकल्पाची पुनर्वसनाची कामे गतीने करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी केल्या.
मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत नागपूर व अमरावती प्रादेशिक विभागातील मदत व पुनर्वसन विभागाकडील प्रलंबित कामांबाबत बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, पेंच खो-यामध्ये पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात चिंचोली, हिंगणा व काटा खमारी उपसा सिंचन योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर महसूल विभागाकडून निधी देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
महसूल, मदत व पुनर्वसन विभागाने ही कार्यवाही समन्वयातून करावी, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
गोसीखुर्द पुनर्वसन प्रकल्पातील नागरी सुविधा अपूर्ण असलेल्या कामांची सद्यस्थितीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
०००
संध्या गरवारे /विसंअ
