Pune | Tue, 17 March 2026

Ad

विधानसभा इतर कामकाज

Sunil Goyal | 6 views
विधानसभा इतर कामकाज

कापूस खरेदीची मुदत १५ मार्च पर्यंत वाढविली पणन मंत्री जयकुमार रावल यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई, दि. २८ : राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. या मागणीचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

यासोबतच राज्य शासनामार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया देखील 1 मार्च 2026 पासून शेतकरी नोंदणी आणि 5875 रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने सुरू करण्यात येत आहे, असे पणन मंत्र्यांनी सांगितले.

०००००

बी. सी. झंवर/विसंअ

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp