
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ विशेष भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आसावरी जाधव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार ६ आणि सोमवार ८ जून रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ ॲपवर प्रसारित केला जाणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व, वाढते वायू, जल व ध्वनी प्रदूषण, प्लास्टिक वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी या मुलाखतीच्या माध्यमातून डॉ. आसावरी जाधव यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच बदलत्या हवामानाचा शेती आणि दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, जलसंधारण, वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, विद्यार्थ्यांची भूमिका आणि पर्यावरण क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयीही त्या सविस्तर माहिती देणार आहेत.
पर्यावरण संरक्षणासाठी उद्योग क्षेत्र आणि सामान्य नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता अधोरेखित करत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून आसावरी जाधव यांनी केले आहे.
0000
जयश्री कोल्हे/स.सं.
