
आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं. जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणं तुमच्या निधनामुळे क्षणभरात निमालं ! संपलं. आम्ही अपूर्ण झालो, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.
ते म्हणतात, आपल्या जीवनात आशाताईंच्या गाणे समृद्ध करणारे, आनंद देणारे क्षण आहेत. काय लिहू? मी निशब्द आहे !! सुरांच्या वैविध्यावरील तुमचे भाष्य म्हणजे, संगीतातील विद्यापीठ. आज एक युग संपल्याचा भावना आहे. तुमच्या जाण्याने दैवी सुरांची आशा संपली.
आशाताई नावाचे आनंदाचे गाव.. राम राम करून दूर निघून गेले. ताई, तुम्ही अजरामर आहात.
00000
