
मुंबई, दि.12 : पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ संपला आहे. त्यांच्या निधनाने भारतीय गायन व संगीतसृष्टीचे कधीही न भरून निघणारे मोठे नुकसान झाले आहे, या शब्दांत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आशाजींनी आपल्या सुरेल, बहुआयामी आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने अनेक दशकं संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. हिंदी आणि मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर एक अढळ स्थान निर्माण केले होते. आशा भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.! या शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
*****
